*स्वास्थ्यसमग्र - भाग 2* आज आपण स्वास्थ्यातील गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत आजकाल टीव्ही, फेसबुक, युट्युब चॅनेल मध्ये आर्थिक गुंतवणूक या संदर्भात बरेच माहिती देणारे व्हिडिओ आढळून येतात .आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आर्थिक गुंतवणुकीबाबत सजग झालेला दिसून येतो खरंतर ही गोष्ट निश्चितच आवश्यक आहे परंतु *आरोग्यातील गुंतवणुकीच्या* बाबतीत मात्र तो उदासीन असतो. खरंतर या वाक्याबाबत बरेच जण कदाचित असा आक्षेप घेतील की आम्ही तर हेल्थ इन्शुरन्स काढला आहे . हेल्थ इन्शुरन्स सारखा गुंतवणीचा मार्ग हा एखाद्या रोग झाल्यानंतर त्यासंदर्भामधल्या आर्थिक नियोजनाचा आहे . मी ज्या गुंतवणुकी संदर्भात बोलतो आहे ती म्हणजे विकार होऊ च नये या संदर्भामध्ये आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की *Investing in yourself is the best investment you will ever make* खरंतर आयुर्वेद शास्त्र हे देखील आरोग्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देणार आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाचे प्रयोजन सांगताना *स्वस्थ स्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्र शमनम् च* । असे सांगितले आहे यामध्ये स्वस्थ म्हणजे जो निरोगी व्यक्ती आहे अशी व...
*स्वास्थ्य समग्र* थेंबा थेंबा नी आपलं जीवन समृद्ध करणारा, सृष्टीच्या कणाकणात चैतन्य पेरणारा, मनामनांना आनंदाच्या अमृतधारा ने भिजवणारा आणि तरलकाव्य भावनांना उत्फुल्लित करणारा एकमेव अद्वितीय असा ऋतुराज म्हणजे *वर्षा ऋतू* होय अशा या आनंदाचे निधान असलेल्या वर्षा ऋतूचा आस्वाद घ्यायचा असेल तर ऋतुसात्म्य गोष्टींचा अंगीकार स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे . वर्षा ऋतूमध्ये अन्नाचे पचन करणारा अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे आहारामध्ये आम्ल व लवणरस जो अग्नी प्रदीपक आहे व वातशामक आहे या रसात्मक आहारीय पदार्थांचा तसेच स्निग्ध पदार्थांचा वापर आहारामध्ये करावा . जे आहारीय पदार्थ एक वर्ष जुने आहेत विशेषतः गहू , तांदूळ, डाळी यांचा वापर आहारामध्ये करणे अत्यंत आवश्यक असते कारण ते पचायला हलके असतात. साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या, भर्जित धान्य यांचा समावेश करावा . जेवण भूक लागल्यावर क्षमतेनुसार करावे . शक्यतो रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे . दोन्ही वेळचे जेवण ताजे व गरम असावे. जेवणामध्ये वातूळ पदार्थ जसे उसळी, बेकरीचे पदार्थ, कच्चे पदार्थ, थंड पदार्थ, शिळे पदार्थ हे जरूर टाळावे खरंतर...