Skip to main content

Posts

स्वास्थ्यसमग्र - भाग 2

  *स्वास्थ्यसमग्र - भाग 2*  आज आपण स्वास्थ्यातील गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत आजकाल टीव्ही, फेसबुक, युट्युब चॅनेल मध्ये आर्थिक गुंतवणूक या संदर्भात बरेच माहिती देणारे व्हिडिओ आढळून येतात .आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आर्थिक गुंतवणुकीबाबत सजग झालेला दिसून येतो खरंतर ही गोष्ट निश्चितच आवश्यक आहे परंतु *आरोग्यातील गुंतवणुकीच्या* बाबतीत मात्र तो उदासीन असतो. खरंतर या वाक्याबाबत बरेच जण कदाचित असा आक्षेप घेतील की आम्ही तर हेल्थ इन्शुरन्स काढला आहे . हेल्थ इन्शुरन्स सारखा गुंतवणीचा मार्ग हा एखाद्या रोग झाल्यानंतर त्यासंदर्भामधल्या आर्थिक नियोजनाचा आहे . मी ज्या गुंतवणुकी संदर्भात बोलतो आहे ती म्हणजे विकार होऊ च नये या संदर्भामध्ये आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की *Investing in yourself is the best investment you will ever make* खरंतर आयुर्वेद शास्त्र हे देखील आरोग्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देणार आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाचे प्रयोजन सांगताना *स्वस्थ स्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्र शमनम् च* । असे सांगितले आहे यामध्ये स्वस्थ म्हणजे जो निरोगी व्यक्ती आहे अशी व...
Recent posts

स्वास्थ्य समग्र भाग -1

  *स्वास्थ्य समग्र* थेंबा थेंबा नी आपलं जीवन समृद्ध करणारा, सृष्टीच्या कणाकणात चैतन्य पेरणारा, मनामनांना आनंदाच्या अमृतधारा ने भिजवणारा आणि तरलकाव्य भावनांना उत्फुल्लित करणारा एकमेव अद्वितीय असा ऋतुराज म्हणजे *वर्षा ऋतू* होय अशा या आनंदाचे निधान असलेल्या वर्षा ऋतूचा आस्वाद घ्यायचा असेल तर ऋतुसात्म्य गोष्टींचा अंगीकार स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे . वर्षा ऋतूमध्ये अन्नाचे पचन करणारा अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे आहारामध्ये आम्ल व लवणरस जो अग्नी प्रदीपक आहे व वातशामक आहे या रसात्मक आहारीय पदार्थांचा तसेच स्निग्ध पदार्थांचा वापर आहारामध्ये करावा . जे आहारीय पदार्थ एक वर्ष जुने आहेत विशेषतः गहू , तांदूळ, डाळी यांचा वापर आहारामध्ये करणे अत्यंत आवश्यक असते कारण ते पचायला हलके असतात. साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या, भर्जित धान्य यांचा समावेश करावा . जेवण भूक लागल्यावर क्षमतेनुसार करावे . शक्यतो रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे . दोन्ही वेळचे जेवण ताजे व गरम असावे. जेवणामध्ये वातूळ पदार्थ जसे उसळी, बेकरीचे पदार्थ, कच्चे पदार्थ, थंड पदार्थ, शिळे पदार्थ हे जरूर टाळावे खरंतर...

जरा विसावू या वळणावर !!

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधे एक असे वळण येते ज्या ठिकाणी थकवा आल्यासारखा वाटतो , विषाद निर्माण होतो थोडक्यात मनाला व शरीराला विसाव्याची गरज निर्माण होते ते वळण म्हणजे रजोनिवृत्ती चा काळ ज्याला आधुनिक शास्त्रात Menopause असे म्हणतात . खरंतर Menopause हा काही आजार नाही . तो तिच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा काळ त्यामुळे आयुष्यातील या बदलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे . पाळी बंद  होण्यापूर्वी साधारणतः ३ ते ४ वर्षे आधीपासून स्त्रियांच्या शरीरात बदल सुरु होतात त्याला perimenopausal period म्हणतात . Menopause निर्माण झाल्यावर खालील लक्षणे प्रकर्षाने जाणवितात १)मासिक पाळी अनियमीत होऊन पूर्णपणे बंद होणे २) मानसिक अस्वस्थता जाणविणे ३ ) नैराश्य निर्माण होणे .  ४) रात्री अचानक घाम येणे ५) योनी भागात रौक्ष्य जाणविणे ६ ) अकारण थंडी वाजणे ७) शांत झोप न येणे ८) त्वचा कोरडी पडणे काही स्त्रियांमधे ही लक्षणे कालांतराने कमी होतात परंतु काही स्त्रियांमधे ती अतिशय त्रासदायक ठरतात अशा वेळी चिकित्सेची गरज असते . श्रीनिधी आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने अशा रुग्णां साठी त्यांचे शारीरीक ...

बरखा ऋतु आयी !!!

कालिदासाच्या स्मृति प्रित्यर्थ आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कलिदासाच्या सर्वात लोकप्रिय मेघदूतातील दुसऱ्या श्लोकातच ( आषाढस्य प्रथम दिवसे ) या दिवसाचा उल्लेख आहे . ऋतु हा कालिदासाचा आवडता विषय . कालिदासाच्या काहीशा उपेक्षित अशा ऋतु संहार या रचनेतील वर्षा ऋतुचे वर्णन उपमा कालिदासस्य या वचनाची सार्थकता पटविणारे आहे . या श्लोकाचा मराठी अनुवाद धनंजय बोर करांनी अतिशय समर्पक रित्या केले आहे . कृष्ण मेघ संपृक्त जाहले भरले जेवी घडे । पथक चालले मत्त गजांचे शोभायात्रे पुढे । वीज कडाडूनि मेघा मधूनी वाजतात चौघडे । वर्षा ऋतुची राजसवारी रसिक मना आवडे । या मधे कालिदासाने वर्षा ऋतुला एका राजाची उपमा दिली आहे . जसे र राजाची स्वारी जात असताना राजमार्ग स्वच्छ करण्यासाठी पाण्याचे घड रिते केले जातात तसे वर्षा ऋतु समोर कृष्ण मेघ पाण्याचे घडे रिते करत आहेत . शृंगारलेले हत्तीचे पथक चालले आहे व त्यासमोर सनई चौघडे वाजत आहेत जरे वर्षा ऋतुच्या आगमन प्रित्यर्थ आकाशातून वीजांच्या स्वरूपात चौघडे वाजत आहेत . असा हा हतोत्साहित मनाला संजीवनी देणारा ' सृष्टी मधे नवचैतन्य पसरविणारा, सतरंगांच...

Healing PCOD with Ayurveda

Polycystic ovarian disease is one of the burning problems today. Because of an erratic lifestyle, an unwholesome diet, and stress, there is a disturbance in the hormonal level which causes an elevation of male hormone (androgen ) in the female body.This imbalance causes irregular menses, excessive hair, acne, pelvic pain etc .PCOS is one of the leading causes of infertility at present. In long-standing pcos complications such as type 2 diabetes, heart disease, endometrial cancer, mood disorders may observed.Acco to Ayurveda due to accumulation of toxins(doshas)in the body causes obstruction lead to hormonal disturbance .In order to address this problem Ayurveda has developed a unique way ie shodhan treatment ie cleansing the body.As far as pcos is concerned vamana followed by basti and rasyana therapy helps .We at Chakrapani hospital treated such cases successfully by specifically designed DSET method.which not only cures but also prevents further recurrence. Vd Mayur Kulkarni  Cha...