कालिदासाच्या स्मृति प्रित्यर्थ आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कलिदासाच्या सर्वात लोकप्रिय मेघदूतातील दुसऱ्या श्लोकातच ( आषाढस्य प्रथम दिवसे ) या दिवसाचा उल्लेख आहे . ऋतु हा कालिदासाचा आवडता विषय . कालिदासाच्या काहीशा उपेक्षित अशा ऋतु संहार या रचनेतील वर्षा ऋतुचे वर्णन उपमा कालिदासस्य या वचनाची सार्थकता पटविणारे आहे . या श्लोकाचा मराठी अनुवाद धनंजय बोर करांनी अतिशय समर्पक रित्या केले आहे .
कृष्ण मेघ संपृक्त जाहले भरले जेवी घडे ।
पथक चालले मत्त गजांचे शोभायात्रे पुढे ।
वीज कडाडूनि मेघा मधूनी वाजतात चौघडे ।
वर्षा ऋतुची राजसवारी रसिक मना आवडे ।
या मधे कालिदासाने वर्षा ऋतुला एका राजाची उपमा दिली आहे . जसे र
राजाची स्वारी जात असताना राजमार्ग स्वच्छ करण्यासाठी पाण्याचे घड रिते केले जातात तसे वर्षा ऋतु समोर कृष्ण मेघ पाण्याचे घडे रिते करत आहेत . शृंगारलेले हत्तीचे पथक चालले आहे व त्यासमोर सनई चौघडे वाजत आहेत जरे वर्षा ऋतुच्या आगमन प्रित्यर्थ आकाशातून वीजांच्या स्वरूपात चौघडे वाजत आहेत .
असा हा हतोत्साहित मनाला संजीवनी देणारा ' सृष्टी मधे नवचैतन्य पसरविणारा, सतरंगांची उधळण करणारा वर्षा ऋतु काही जणांना त्रासदायक ठरतो ते म्हणजे वात व्याधीचे रुग्ण
आयुर्वेदानुसार व्याधी निर्मितीला प्रमुख कारण वात पित्त व कफ या दोषांचा प्रकोप होय . आयुर्वेदीय ग्रंथांमधे ऋतुचे स्वरूप व त्यांचा दोषांवर होणार परिणाम स्पष्ट केला आहे. ग्रीष्म ऋतु मधे वातावरणात कोरडे पणा वाढलेला असतो त्याचा परिणाम म्हणजे वात दोषाचा संचय होत असतो. परंतु तो वाढलेला वात दोष रोग निर्माण करू शकत नाही कारण त्या काळात वातावरणात असलेली उष्णता होय . परंतु जसे वर्षा ऋतुचे आगमन होते तस तसे वातावरणात शीतता (थंड पणा ) वाढावयास लागतो . कोरडेपणा व थंडपणा हे दोन्ही वात दोषाला अनुकूल असल्यामुळे या काळात वातविकार उत्पन्न होण्याची शक्यता अधिक वाढते . वातविकारां मधे विशेषतः संधिवात (osteoarthritis) आमवात ( Rheumatoid arthritis), गृध्रसि (sciatica ) , मणक्यांचे विकार ( cervical / lumbar spondylosis ) , पोटाचे विकार इ.
आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् । आतुरस्य विकार प्रशमनं च ।हे आहे रोग उत्पन्नच होऊ नये किंवा जरी तो उत्पन्न झाला तर लवकर नियंत्रणात यावा यासाठी आयु र्वेद शास्त्र प्रयत्नशील असते
वातव्याधी चा विचार केला तर आयुर्वेदानुसार वातदोषाचे प्रमुख कार्यकारी स्थान पक्वाशय ( Intestine )असते . या स्थानातील वात दोषाचे नियंत्रण केल्यास संपूर्ण शरीरातील वात दोष नियंत्रित करता येईल व या स्थानावर सर्वोत्तम कार्यकारी चिकित्सा म्हणजे बस्ति चिकित्सा होय . यामधे औषधी सिद्ध तैल किंवा काढे गुदमार्गाद्वारा शरीरात प्रवेशित केले जातात व त्याद्वारा वायु चे शोधन होऊ वातविकार बरे करता येतात. आयुर्वेदा ने बस्ति चिकित्सा ही अर्ध चिकित्सा मानली आहे तज्ञ चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली जर ही घेतली तर संपूर्ण लाभ मिळू शकतो असा विश्वास वाटतो .
वैद्य मयुर कुलकर्णी
श्रीनिधी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म केंद्र नासिक
मो - 9422828330
Comments
Post a Comment