प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधे एक असे वळण येते ज्या ठिकाणी थकवा आल्यासारखा वाटतो , विषाद निर्माण होतो थोडक्यात मनाला व शरीराला विसाव्याची गरज निर्माण होते ते वळण म्हणजे रजोनिवृत्ती चा काळ ज्याला आधुनिक शास्त्रात Menopause असे म्हणतात . खरंतर Menopause हा काही आजार नाही . तो तिच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा काळ त्यामुळे आयुष्यातील या बदलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे . पाळी बंद
होण्यापूर्वी साधारणतः ३ ते ४ वर्षे आधीपासून स्त्रियांच्या शरीरात बदल सुरु होतात त्याला perimenopausal period म्हणतात . Menopause निर्माण झाल्यावर खालील लक्षणे प्रकर्षाने जाणवितात
१)मासिक पाळी अनियमीत होऊन पूर्णपणे बंद होणे
२) मानसिक अस्वस्थता जाणविणे
३ ) नैराश्य निर्माण होणे .
४) रात्री अचानक घाम येणे
५) योनी भागात रौक्ष्य जाणविणे
६ ) अकारण थंडी वाजणे
७) शांत झोप न येणे
८) त्वचा कोरडी पडणे
काही स्त्रियांमधे ही लक्षणे कालांतराने कमी होतात परंतु काही स्त्रियांमधे ती अतिशय त्रासदायक ठरतात अशा वेळी चिकित्सेची गरज असते . श्रीनिधी आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने अशा रुग्णां साठी त्यांचे शारीरीक व मानसिक स्वास्थ्य सुधारावे या साठी औषधोपचार या बरोबरच समुपदेशन व आहार मार्गदर्शन केले जेते जेणे करून हा बदल सुसह्य होईल व आयुष्य पुन्हा नव्या उमेदीने जगता येईल
वैद्य मयुर कुलकर्णी
एम् डी आयुर्वेद
श्रीनिधी आयुर्वेद चिकित्सालय
नासिक
9422828330
Comments
Post a Comment